
दरम्यान, टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ५० आरटीओ अधिकारी बाहेर पडले आहेत, अशी अफवा गुरुवारच्या रात्री टॅक्सीचालकांमध्ये पसरली. त्यामुळे विमानतळावर असलेल्या एरोमॉलमध्ये रात्रीच टॅक्सीचालकांनी सेवा थांबविली. परिणामी, येथे चांगलाच गोंधळ उडाला. टॅक्सी सेवा थांबल्यामुळे रात्री विमानाद्वारे बाहेरून पुण्यात येणाऱ्या विमानप्रवाशांना बराच वेळ वाहन मिळाली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.