
काजल कृष्णा कदम (वय २७) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे तर कृष्णा कदम असे आरोपीचे नाव आहे. काजल व कृष्णा हे दोघेही मजूरी करतात. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात गेल्या काहिड दिवसांपासून वाद सुरू होते. या वादामुळे दोघेही घटस्फोट देखील घेणार होते. मात्र, समजूददारीने वागण्याचे ठरवत पुन्हा एकत्र आले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी दोघेही सातारा मार्गावरील अश्विनी लॉजमध्ये आले. दोघांनी लॉजमधील खोलीत दारू प्यायली. नशेत असतांना दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. याच वादात रागाच्या भरात कृष्णाने चाकूने काजलचा गळा चिरला. त्यानंतर कुणाला ही बाब कळू नये यासाठी त्याने लॉजच्या खोलीला दरवाजा बाहेरून बंद करून फरार झाला.





