
आवक कमी तर मागणी जास्त
मुंबईत गेल्या वर्षी १५ टन तूरडाळ येत होती. मात्र, दरवाढ झाल्यामुळे ही आवक कमी झाली. ही आवक आता ३ टनांवर आली आहे. मात्र, मुंबईकरांची डाळीची मागणी ही ५ टनांपेक्षा जास्त आहे. दर जास्त असल्याने किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करतात. तर ही डाळ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा दृष्टीकोण असून टंचाईसदृश्य स्थिती नसल्याचे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.