
कोर्टाची तारीख असल्यामुळे सावनी सईला घेऊन कोर्टात जाते. तिथे सागरही पोहोचतो. मात्र, सईला कोर्टात आणलेले पाहून सागरला राग अनावर होतो. माहिर सागरला समजावतो. दादूस जरा शांत रहा, नाही तर आपण सईची कस्टडी गमावून बसू. सागर त्याचे म्हणणे ऐकतो आणि शांत बसतो. दुसरीकडे सईला मुक्ताची आठवण येते. ती मुक्ताला फोन करुन मला घरी परत यायचे आहे. इथे माझ्यासोबत खेळायला देखील कोणी नाही असे सांगते. आता मालिकेच्या आगामी भागात कोर्ट सईच्या कस्टडीवर काय निर्णय घेणार? सावनी सागरला हरवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.






