
मुक्ताला वाटले वाईट
आदित्य ज्या परिस्थितीमधून जात आहे ते पाहून मुक्ताला अतिशय वाईट वाटले आहे. मुक्ताने सागरला सर्व घडलेला प्रकार सांगितला आहे. त्यानंतर सागरला प्रश्न पडतो की आता आदित्यला कसे सांभाळायचे पालक म्हणून आपण काय करायला हवे? अशा अनेक गोष्टी सागरच्या मनात येतात. मुक्ता सागरला धीर देते. ती आपण आदित्यला विश्वास द्यायला हवा की आपण सगळी त्याची माणसे आहोत, एक कुटुंब आहोत. आपण त्याचे कधीही वाईट होऊ देणार नाही. त्यासाठी मुक्ता काही गोष्टींचे आयोजन करते. आता हे सगळं पाहिल्यावर आदित्य कसा वागणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.