
मुक्ताला कळाले सागरचे सत्य
सागर गेल्या काही दिवसांपासून मुक्ता पासून माधवीचा अपघात आदित्यने केला हे लपवताना दिसत आहे. पण सागरला हे कळत नाही या सगळ्या गोष्टी जर मुक्ताला सांगितल्या तर तिची प्रतिक्रिया काय असेल? ती काय आदित्यला माफ करेल ना? असा प्रश्न सागरच्या मनात येतो. त्यामुळे तो सगळे लपवताना दिसतो. याच विषयावर सागर सावनीशी बोलत असताना मुक्ता येते. तेव्हा तो फोन मिहिरचा असल्याचे खोटे बोलतो. पण सावनीचा मेसेज पाहिल्यावर मुक्ताला खात्री पटते. ती सागरला खोटं का बोलला? याचा जाब विचारते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








