
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सागर आणि सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी भांडताना दिसत आहेत. सागरला सई पासून लांब राहताना त्रास होतोय. त्याला तिला घरी आणायचे आहे. दुसरीकडे सावनीचा बॉयफ्रेंड हर्षवर्धनला सागरला हारवायचे असल्यामुळे त्याला सईची कस्टडी हवी असते. दरम्यान, यावर कोर्टात सुनावणी सुरु असताना सई मुक्तासोबत रहायचे आहे असे सांगते. त्यामुळे आता कोणाला तिची कस्टडी मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.






