
हिंदी पट्ट्यात पकड ढिल्ली होऊ देणे मोठी चूक –
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी हिंदी पट्ट्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत. तर वायनाडमधून जिंकल्याचा काहीच फायदा नाही. काँग्रेसची लढाई मुख्यरित्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्यात आहे. मात्र त्यांचे नेते मणिपूर आणि मेघालयाचे दौरे करतात. केवळ केरळमध्ये जिंकून देशात विजय मिळवता येत नाही. राहुल गांधी यांनी अमेठी सोडणे देशातील जनतेला चुकीचा संदेश दिल्यासारखे आहे. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे उदाहरण देत म्हटले की, पीएम मोदी २०२४ मध्ये गुजरातसोबतच उत्तर प्रदेशमधूनही निवडणूक लढले होते.