
दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी पुजारीने चीनमधील एका महिलेशी लग्न केले, तिथे तो एका मुलाचा बाप झाला, त्याचा मुलगा आता चार वर्षांचा आहे. त्याला पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरुच होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी तब्बल २० वर्ष लागले. मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते, ज्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली होती. २०२० मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पुजारीच्या आईला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याला लवकरच भारतात परत आणता येईल, असे पोलिसांनी सांगितले.






