
प्रमोद प्रभुलकर म्हणाले की, ‘मधुराणीने असं वेगळं काहीच केलेलं नाही. केवळ सोशल मीडियावर फोटो शेअर केले म्हणजेच नाते आनंदी आहे, असे होते का? फोटो नाहीत म्हणजे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आहेत आणि आमचं नातं तुटणार आहे, असा निष्कर्ष कुणी कसं लावू शकतं? प्रसिद्धी माध्यमांनीही अशा बाबतीत आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात. आपल्या देशांत इतर अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष देण्याऐवजी एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी अशाप्रकारे दाखवणं किती योग्य आहे?’, असा सवालही त्यांनी केला.







