
महाविकास आघाडीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तीन घटक पक्षातील जागावाटपाची तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात आम्ही प्रवेश करून काय करणार. आम्ही २६ मार्चनंतर त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार नाही.आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र देत सात जागांवर पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. त्यावर एकमत झाले तर ठीक, नाहीतर आम्ही २६ तारखेला आमची भूमिका स्पष्ट करणारच आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.



