
आरएसएसशी लढण्यासाठी सामाजिक लोकशाहीचा अजेंडा आवश्यक
वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात अविरतपणे भाजप आणि आरएसएसशी लढत आहे. वंचित बहुजन आघाडी केवळ सहा वर्ष जुना पक्ष असला तरी आमचा वैचारिक लढा नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे. विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार या महापुरुषांनी केला होता. धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो, असं या महापुरुषाचे म्हणणे होते. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.





