
राज्य सरकारचा निधी परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा लोकांवर टाडा लावून त्यांना कारागृहात टाकलं पाहिजं. महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशा, बंगालमध्ये तसेच अन्य राज्यातही आहे. परराज्यातील मराठी माणसानं काय करायचं? समाजात द्वेष पसरवणारी ही वक्तव्ये आहेत. यामुळे समाजासोबतच देशही दुभंगतो. यूएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्टनुसार अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे.







