
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री देखील सिग्नलवर लाल दिवा लागताच थांबतील असा निर्णय जाहीर केला आहे. त्यांचा हा निर्णय नाटक असल्याचे राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भरतपूर : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री देखील सिग्नलवर लाल दिवा लागताच थांबतील असा निर्णय जाहीर केला आहे. त्यांचा हा निर्णय नाटक असल्याचे राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हालचालीला त्यांनी नाटक ठरवलं आहे. मंत्री जातात तो मार्ग आधीच ठरलेला असतो पोलिस तैनात असतात मग सिग्नलवर थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे असे ते म्हणाले.