
मुंबईत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी आणि वेगवान वाहतुकीसाठी मुंबई पालिकेतर्फे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम नियोजित वेळेत करणयाचे पालिकेचे उद्दिष्ट आहे, या कामाचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बांधण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.





