
नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान, सिव्हील सोसायटी ग्रुप्सने भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून देशातील सार्वत्रिक निवडणुकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये मतदानाचा डेटा एकाचवेळी अंतिम स्वरुपात जाहीर केला जात नसल्याची तक्रार यात करण्यात आली आहे.
तसेच सन 2019च्या मतदानाच्या डेटामधील तफावतीवर या ग्रुप्सनी शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच, PM मोदींना ९६ तासांसाठी प्रचारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, निवडणुकीदरम्यान हेटस्पीचवर नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. सरोगेट जाहिरातींवर कारवाई करण्यात अपयश, राजकीय पक्षांविरुद्ध निःपक्षपाती कारवाई करण्यात आलेले अपयश असे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित करण्यात आले आहेत.









