
PM Modi : मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडल्यावर अनेक एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. एक्झिट पोलनुसार, सलग तिसऱ्यांदा मोठ्या बहुमताने एनडीए सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ४५ तासांच्या ध्यानानंतर कन्याकुमारीहून राजधानीत परतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते परत येताच पंतप्रधान पीएमओ अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेणार आहेत. या बैठकीत पहिल्या १० दिवसांचा अजेंडा त्यांनी तयार केला आहे. मोदी सरकार तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या १०० दिवसांत काय करायचे आहे याची यादी त्यांनी तयार केली आहे.








