
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारमध्ये दिल्लीतून १ रुपया जरी निघाला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचत होते. तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्रातले होते, मात्र शेतकऱ्यांना काही मिळाले नाही. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. आज मी केवळ एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१हजार कोटी इतकी मोठी रक्कम जमा झाली. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. मात्र जर काँग्रेस सरकार असते तर या २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मधल्या मध्येच गडप झाले असते.






