
भारतात धार्मिक स्थळे, विशेषत: मशिदी आणि दर्गा परत मिळवण्यासाठी नव्याने खटले दाखल करण्यास आणि याबाबत कोणतेही आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने देशातील न्यायालयांना पुढील निर्देश येईपर्यंत मनाई केली आहे. याबाबतचे काही प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नव्याने कोणताही खटला दाखल केला जाणार नाही, असे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज म्हटले आहे.







