
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हे पत्नी राजश्री सोबत थेरगाव येथे राहत होते. त्यांची पत्नी ही बाहेर गावी गेली होती. राजश्री या काल सकाळी गावावरून शिवाजीनगर बसस्थानक येथे आल्या. त्यांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी पती भाऊसाहेब यांना फोन केला. यावेळी भाऊसाहेब हे घेण्यासाठी येतो म्हणाले. दरम्यान, राजश्री या त्यांची वाट पाहत होत्या. बराच वेळ वाट पाहून देखील ते आले नसल्याने त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे राजश्री या थेट घरी बसने निघाल्या. त्या घरी आल्या असता, त्यांच्या मुलगा आशिषने याने दरवाजा उघडला.







