
या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी केली आहे. तर, श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तानाजी घाडगे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘बस्ता’, ‘बरड’ असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी मनोरंजन विश्वाला दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार पाहायला मिळणार आहेत.








