
सध्या पेटीएमवर संकटांचे ढग जमा झालेले आहेत. सतत होणाऱ्या कारवायांमुळे पेटीएम ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत खुलासा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईमुळे 80 ते 85 टक्के पेटीएम वॉलेट ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.
नवी दिल्ली : सध्या पेटीएमवर संकटांचे ढग जमा झालेले आहेत. सतत होणाऱ्या कारवायांमुळे पेटीएम ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत खुलासा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईमुळे 80 ते 85 टक्के पेटीएम वॉलेट ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच उर्वरित ग्राहकांना त्यांचे अॅप इतर बँकांशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दास म्हणाले की, एकूण पेटीएम वॉलेटपैकी 80 ते 85 टक्के इतर बँकांशी जोडलेले आहेत आणि उर्वरित 15 टक्के वॉलेट्सना इतर बँकांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, आरबीआयने नियमन केलेल्या घटकाविरुद्ध कारवाई केली आहे. जी या प्रकरणात पीपीबीएल आहे आणि त्यात फिनटेक कंपन्यांविरुद्ध नाही. आरबीआय आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला अनुकूल आहे. आरबीआय फिनटेकला पूर्ण समर्थन करते आणि पुढेही करत राहील.