
या वक्तव्यावर क्षत्रिय समाज झाला संतप्त
२४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री परसोत्तम रुपाला यांनी राजकोट येथे एका कार्यक्रमात म्हटले की, गुजरातच्या महाराजांनी (क्षत्रिय राजे) इंग्रजांसोबत रोटी आणि बेटीचा व्यवहार केला. परंतु दडपशाही करूनही दलित समाजाने ना धर्मांतर केले, ना वर्तनात बदल केले, रुपाला यांच्या या वक्तव्यामुळे राजपूत समाजात संताप पसरला आहे. क्षत्रिय समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर परशोत्तम रुपाला यांनी माफी देखील मागितली. मात्र, असे असले तरी हा वाद थांबन्याचे नाव घेत नाही. रुपाला यांनी मात्र आपल्या वक्तव्यात क्षत्रिय हा शब्द वापरला नाही. त्यांनी आपल्या निवेदनात महाराज असा शब्द वापरला होता. रुपाला हे सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री आहेत.






