
राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत असून आता पालघरमध्ये उष्माघाताने (Heat Stroke) १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा





