
शरद पवारांचा प्रभाव असाही संपला असता!
‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद होत राहिले असते तर शरद पवार यांचा प्रभाव पुढच्या दोन-तीन वर्षांत असाही संपून गेला असता. मात्र, अजित पवारांना फोडल्याचा परिणाम उलटा झाला. भाजपच्या समर्थकांनाही हे आवडलं नाही. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध वर्षानुवर्षे लढलो त्यांच्याशीच युती करावी लागली. भाजपची प्रतिमा तिथं पूर्ण खालावली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी इतकी वर्षे केलेला संघर्ष वाया गेला. भाजप इतरांसारखाच केवळ एक पक्ष बनून राहिला, असं लेखात नमूद करण्यात आलं आहे.