
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देण्यासाठी ७,८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीच्या शपथ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे पोलीसांनी स्थानिक गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान घेऊ दिले नाही. या घटनेचा विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.







