
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिव्ह्यू कमिटीने अक्षय कुमार याचा हा चित्रपट पाहिला असून, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळायला हवे, या निष्कर्षापर्यंत कमिटी पोहोचली आहे. एवढेच नाही तर, चित्रपट पाहिल्यानंतर समितीने चित्रपटात २० कट्स करण्यास सांगितले असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, आतापर्यंत सीबीएफसीने या कट्सबाबत निर्मात्यांना अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही, ज्यामध्ये या कट्सचे कारण देण्यात आले आहे.







