
शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले नितीन गडकरी?
पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन गाजत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मात्र याबाबत चकार शब्द काढलेला नाही. या आंदोलनाबाबत नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, ‘तांदूळ, मका, साखर, गव्हाचं अतिरिक्त होणारं उत्पादन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हरियाणामध्ये गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचेप्लॅटफॉर्म वापरावे लागतात. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाही’ असं नितीन गडकरी म्हणाले.