
नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर,व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.




