
निताशा म्हणतात…
माझ्या प्रवासाची आणि सामानाची सर्व व्यवस्था कर्नाटक सरकारनं केली होती. माझ्याकडं सरकारच्या आमंत्रणाचं अधिकृत पत्रही होतं. मात्र, बेंगळुरू विमानतळावर उतरल्यावर मला प्रवेश नाकारण्यात आल्याचं कळलं. ‘आम्ही काही करू शकत नाही, दिल्लीचे आदेश आहेत, असं इमिग्रेशन विभागाच्या सांगितल्याचं निताशा यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.