Neetu Kapoor: ऐन लग्नात नीतू कपूर पडल्या होत्या बेशुद्ध, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं

0
17
Neetu Kapoor: ऐन लग्नात नीतू कपूर पडल्या होत्या बेशुद्ध, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं


२२ जानेवारी १९८० साली नितू आणि ऋषी यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वजण आले होते. मात्र भर लग्नाच्या मांडवात बेशुद्ध होण्यावर नीतू कपूर म्हणाल्या, “आमच्याच लग्नात आम्ही बेशुद्ध पडलो होतो. खरं तर बेशुद्ध पडण्यामागचे कारण दोघांचेही वेगवेगळे होते. मी लग्नात जो लेहंगा परिधान केला होता तो प्रंचड जड होता. त्यामुळे मला त्रास होत होता आणि तो सांभाळत असतानाच मी बेशुद्ध पडले. तर ऋषी यांचे बेशुद्ध पडण्यामागचे कारण वेगळे होते. लग्नात बरेच पाहुणे आले होते. फार गर्दी झाली होती. कदाचित ही गर्दी पाहूनच त्यांना चक्कर आली असावी. परंतु आम्हा दोघांनाही बरे वाटायला लागल्यानंतर आमचे लग्न सुरळीतपणे पार पडले.”



Source link