
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवारांना दिलं नाही, कारण जयंत पाटील यांना माहिती होतं की शरद पवारांना किती वाईट वाटेल. त्यावेळी शरद पवारांना एकटं सोडा,आपण जाऊया, असं काही आमदारांचं म्हणणं होतं. शरद पवारांना एकटं राहू द्या,जाऊ आपण, असं आमदार दिलीप बनकर म्हणाले होते. तेव्हा जयंत पाटील ढसाढसा रडले होते’,असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.







