
जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे४० जण गेले त्यांनी तक्रार अजित पवारांबाबत होती. आता तीच तक्रार पुन्हा असेल तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्यांच्या मनात आता परत फिरायचे वेध लागले आहेत. ४० आमदारांच्या बळाबर त्यांच्या गटाचा मुख्यमंत्री व ८ ते ९ मंत्रीपदे आहेत. मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला ज्यांचे १०५ आमदार आहेत, त्यांना केवळ ४ ते ५ मंत्रिपद मिळाली आहेत. दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत. आमच्या मविआला तीन चाकी गाडी म्हणत होते, आता काय? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.







