
पंजाबमधील तुरुंगांमध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh) यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर राजकारण सोडेन, असेही सिद्धू म्हणाले.
चंडीगड : पंजाबमधील तुरुंगांमध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh) यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर राजकारण सोडेन, असेही सिद्धू म्हणाले.
मुख्यमंत्री भगवंत मान हे तुरुंग मंत्रीही आहेत. त्यांनी काय केले ? असा सवाल करत सिद्धू म्हणाले, कारागृहात अंमली पदार्थांच्या गोळ्या विकल्या जात आहेत. माझे म्हणणे खोटे ठरले तर मी राजकारण सोडेन. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, ड्रग्ज माफिया आणि तुरुंग यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उच्च न्यायालयानेही याबाबत आठवडाभरात धोरण तयार करण्यास सांगितले आहे.










