
सय्यद आणि बाबू दोघेही एकाच परिसरात राहत होते आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांची मैत्री झाली होती. बाबूखान यांच्या मार्फत अल्पवयीन मुलींना भेटला आणि त्यांच्यासोबत नियमित वेळ घालवू लागला. शुक्रवारी बेलापूर रेल्वे स्थानकावर बाबू या मुलींना भेटला आणि त्यांना दुचाकीवरून पारसिक हिलच्या दिशेने निघाला, तेथे त्याने बिअर प्यायली आणि मुलींना कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. मात्र, बिअर प्यायल्यानंतर बाबू मुलींशी गैरवर्तन करू लागला. एका मुलीने सय्यदला या घटनेची माहिती दिली. त्याने घटनास्थळी धाव घेऊन मुलींसोबत बाबूवर दगडाने हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.







