
आता आनंदी योजनाला जाब विचारणार आहे. यावेळी योजना राघवबद्दल अनेक वाईटसाईट गोष्टी सांगणार आहे. तर, राघववर मेहेरबानी म्हणून मी अजून पोलिसांत गेलेले नाही, असे योजना आनंदीला म्हणणार आहे. राघवने आपल्यासमोर येऊन आपल्या पायावर नाक घासून माफी मागावी, तरच मी त्याच्यावर लावलेले आरोप मागे घेण्याचा विचार करेन, अशी अट योजनाने घातली आहे. आता यावर आनंदी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.







