
आपल्या नवऱ्यावर इतके गंभीर आरोप का लावले हे विचारण्यासाठी आनंदी योजनाकडे गेली होती. यावेळी योजना आनंदीसमोर एक अट ठेवणार आहे. योजना आनंदीला सांगणार आहे की, ‘तुझ्या नवऱ्याने येऊन माझ्या पायावर नाक घासून माफी मागितली पाहिजे. तरच मी त्याच्यावरचे आरोप मागे घेईन.’ यानंतर आता ननाद खूप विचार करून तिला यासाठी होकार देणार आहे. तर, पोलीस तक्रार करायला जाणाऱ्या राघवला रोखून ती यासाठी राजी करते. आता आनंदीच्या आनंदासाठी राघव देखील तिची ही मागणी मान्य करणार आहे. मात्र, आता आनंदीच्या डोक्यात एक नवी कल्पना येणार आहे.






