
आनंदीला मुलं होत नाही, म्हणून आता तिच्या सासूने म्हणजे राघवच्या आईने तिला नवरात्रीचं व्रत करायला लावलं आहे. मात्र, या सगळ्याला राघवचा विरोध आहे. यामुळे आता आनंदी राघवपासून लपून हे व्रत करण्याचा प्रयत्न करत होती. आई होण्यासाठी आनंदी आता काहीही करायला तयार आहे. त्यामुळे ती सगळे प्रयत्न पणाला लावत आहे. आपल्याला आई होता येईल, या भाबड्या आशेने ती सगळे प्रयत्न करत आहे. मात्र, आनंदीचा हाच भोळेपणा राघवला पटत नाहीये. तिने अशा अंधश्रद्धांना बळी पडून, आपल्या जीवाशी खेळ करू नये, असे राघवला वाटत आहे. परंतु, आता राघवचं बोलणं टाळून आनंदी हा उपास आणि नऊ दिवसांचे व्रत पूर्ण करणार आहे.








