
आनंदीला मुलं होत नाही, म्हणून आता तिच्या सासूने म्हणजे राघवच्या आईने तिला नवरात्रीचं व्रत करायला सांगितले आहे. मात्र, राघवचा याला विरोध आहे. यामुळे आता आनंदी राघवपासून लपून हे व्रत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला बाळ होण्याची आशा आहे. त्यामुळे ती सगळे प्रयत्न करायला तयार आहे. आपल्याला आई होता येईल, या भाबड्या आशेने ती सगळे प्रयत्न करत आहे. मात्र, आनंदीचा हाच भोळेपणा राघवला आवडत नाहीये. तिने अशा अंधश्रद्धांना बळी पडून, आपल्या जीवाशी खेळ करू नये, असे राघवला वाटत आहे.मात्र, आनंदीच्या पोटी बाळ जन्माला यावे म्हणून तिची सासू देवाचा धावा करत आहे.








