
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सटाणा, येवला, निफाड, दिंडोरी, चांदवड, पेठ आणि नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना ऐनवेळी मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पावसाने पुनरागमन केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.




