
पुढे नसीरुद्दीन यांनी निर्माते हे केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपट बनवतात असे म्हटले आहे. “हिंदी चित्रपटांसाठी तेव्हाच थोडीफार आशा निर्माण होईल जेव्हा ते फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवणे बंद करतील. चित्रपट म्हणजे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे, या दृष्टीकोनातून पाहणे ते बंद करतील. पण मला असे वाटते की आता खूप उशीर झाला आहे. यावर आता काही उपाय नाही कारण ज्या चित्रपटांना हजारो लोक पाहतात तसे चित्रपट बनत राहतील आणि लोक त्याला बनवत राहतील. त्यामुळे ज्या लोकांना गंभीर मुद्द्यांवर चित्रपट बनवायचे असेल, त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी वास्तविकता दाखवावी आणि ती अशा पद्धतीने दाखवावी की बदल्यात त्यांना कोट्यवधी रुपये मिळू नये किंवा ईडी त्यांचे दार ठोठवू नये” असे नसीरुद्दीन म्हणाले.