
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, खर्गेंनी आम्हाला ४०० जागांचा आशीर्वाद दिला आहे. मी प्रार्थना करतो की, त्यांच्या ४० जागा वाचतील. मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. १० वर्षांत काँग्रेसने देशाला ११ व्या क्रमांकावर आणलं आहे. आम्ही १० वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणलं. ही काँग्रेस आपल्याला आर्थिक धोरणांवर भाषण देत आहे.







