Narayan Murthy | सुशिक्षित लोक अतिरिक्त काम करणं हे दुर्दैव मानतात, नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती पुन्हा चर्चेत! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
2
Narayan Murthy | सुशिक्षित लोक अतिरिक्त काम करणं हे दुर्दैव मानतात, नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती पुन्हा चर्चेत! | Navarashtra (नवराष्ट्र)


founder of Infosys Narayan Murthy

नारायण मूर्ती म्हणाले की, सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे हे दुर्दैव आहे. ते म्हणाले की, भारतात जास्त काम करणं सामान्य आहे. शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) गेल्या अनेक दिवसापासून काही ना काही कारणामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसापुर्वी त्यांनी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने चांगलीच चर्च झाली होती. त्यांच्या वक्तव्याला सोशल मीडियावर अनेकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं होतं तर काहींनी त्याच समर्थनही केलं होत. आता नारायण मूर्ती पुन्हा एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. त्यांनी आता एका मुलाखतीत म्हटले आहे की, देशातील सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे दुर्दैवी आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले नारायण मूर्ती

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती म्हणाले की,  ‘म्हणून आमच्यापैकी ज्यांनी मोठ्या सवलतीत शिक्षण घेतले त्यांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत. आपण किती भाग्यवान देश आहोत याचा विचार केला पाहिजे की आपल्याला फार कष्ट करावे लागले नाहीत. मी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा सोशल मीडियावर खूप विरोध झाला. मला चुकीचे म्हणणारे बरेच लोक होते. काही चांगल्या लोकांनीही माझे कौतुक केले. विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मी बरोबर असल्याचे सांगितले.






Source link