
नम्रता म्हणाली होती की, महेशने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते की, त्याला काम न करणारी बायको हवी आहे. जर, मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरीही त्याने मला ती नोकरी सोडायला सांगितली असती. आमच्या दोघांमध्ये या मुद्द्यांवरून काही मतभेदही झाले होते. मात्र, या सगळ्यानंतर संसाराची सुरुवात झाली. महेश प्रमाणेच नम्रताने देखील एक अट घातली होती. लग्नानंतर एका अपार्टमेंट घरामध्ये राहायचं, अशी ती अट होती. कारण, महेश बाबूच्या भल्यामोठ्या बंगल्यात कसं राहायचं, या विचारानेच नम्रताला घाम फुटायचा. त्यामुळे पत्नीच्या इच्छेचा मान राखून अभिनेता देखील छोट्या अपार्टमेंटमध्ये राहू लागला होता.







