
पुढे नम्रता संभेरावने लिहिले की, ‘बॅकस्टेज आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे, यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला. पण, हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीच घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार कराल, अशी खात्री आहे. यापूर्वी जसं प्रेम केलंत, तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र या नाटकाच्या नवीन संचावर कराल, अशी अशा आहे. मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या एक्झिट घेतली, तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच एक्झिट होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई, विनोदाचा बाप पॅडी दादा, माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सुप्रीम प्रियदर्शन दादा तुम्हाला व ‘कुर्रर्रर्र’च्या सर्व टीमला पुढील प्रयोगांसाठी हाऊसफुल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच …’






