
नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवार यांना गृहखाते न देण्याचे जाहीर विधान केले. यावरुन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना टीका केली.
पुणेः बारामतीमध्ये पार पडलेला नमो महारोजगार मेळावा अनेक बाबींसाठी चर्चेचा विषय ठरला. यामध्ये सुप्रिया सुळे व अजित पवार यांची न बोलणं, शरद पवार व विखे पाटील यांची भेटीची टाळाटाळ यांचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना गृहखातं देणारं नसल्याचं वक्तव्य चर्चेचा कारण ठरलं. यावरुन आता विरोधकांनी टीकास्त्र डागलं असून यामागचे कारण विचारले आहे. यावरुन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना टीका केली.
नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ अजित पवार यांना गृहखाते न देण्याचे जाहीर विधान केले. मात्र त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद शेअर करून, शिंदे सेनेचा आक्षेप झुगारून अर्थखातेही दिले. असे असताना अजित पवारांच्या विश्वसनीयतेवर, कार्यक्षमतेवर, हेतुवर आक्षेप उपस्थित करायचे कारण काय ते जाहीर करावे असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.










