
मिळालेल्या माहितीनुसार, दयाशंकर अवधेश प्रजापती (वय, ८) आणि कैलास अवधेश प्रजापती (वय,१२) हे दोघे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास महादुला परिसरात पतंग उडवित होते. मात्र, त्यांची कापली आणि ती कोराडी उर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली. पतंग पकडण्यासाठी दयाशंकरने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहायला लागला. दयाशंकर पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच कैलासने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहू लागला.







