
अपघाताचे प्रमाण वाढल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, “इतरवेळी ट्रॅफिक पोलिस अलर्ट असतात मग दारू पिऊन , ड्रग सेवन करून गाडी चालवणाऱ्या बेधुंद आरोपींकडे पोलिसांचे लक्ष नाही का? की कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहे? मागील २ वर्षात नागपूर क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाते आहे. त्यात असे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.”