
मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?
मुंबईत आयोजित आपल्या एका कार्यक्रमात मुनव्वर लोकांना विचारतो की, तुम्ही सगळे मुंबईचेच आहात ना? की कोणी येथे येण्यासाठी लांबचा प्रवास करुन आलं आहे? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. त्यावर फारुकी म्हणतो आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात,तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना चु#$ बनवतात. मुनव्वरच्या या विनोदावर प्रेक्षकांमधूनही टाळ्या पडल्या. फारुकी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकाला विचारलं, “तुम्ही कोकणी आहात का?” त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला.