
तलावांची पातळी खालावल्याने महापालिकेने १ मार्च रोजी मुंबईत १० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, राखीव साठ्यातून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. पाईपलाईनच्या शेवटी किंवा उंच उतारावर असलेल्या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू शकते. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.







